Friday 28 February 2014

My thoughts about the support given to Mamta Banerjee....

28 February 2014.   

In my whole life I haven’t supported any of the political party, but for the first time as I have shown my support to Mamta Banerjee, people are asking why I am doing so, as I say these parties are unconstitutional and taking part in elections?
   For this I have the answer that the forthcoming elections of-2014 are crucial and prove to be a turning point. Due to corruption, prize hike, injustice, Inequality of income, and so on, people are demanding change. Up to now particular political parties have been leading the country. I think these parties cannot give a bright future to the country; therefore people are seeking and thinking a new way to bring change. If the voters in this country think so, they can do it. Mamta Banerjee and her party is not having financial support from any hidden resources. Her party is poor in financial perspective as compared with other parties. As per me, I haven’t any bank balance, but we both have a strong desire to bring this change, expected by the people. Keeping in view this thing we have pointed out 17 things and have sent to all the parties for knowing if they are ready to implement it. I say very honestly if these 17 points come in effect, the entire picture can be changed. We are confident about it. Unfortunately no party except Mamta Banerjee has answered us on this issue up to now. Only Mamta Banerjee has written me and assured for its implementation.
   I have come to know about Mamta Banerjee, in spite of a Chief Minister she hasn't used Government’s Bungalow, car or any other allowances. Still she lives in a small home that is inherited to her from her ancestor. She still uses sleeper and wears Saree made from “Khadi”.  This scarifies I think is important for social and national point of view. She has been constantly fighting for the welfare of this society and country. She is against all mal – practices which are going on. She has 65 stitches in her head, her hand and leg has fractured, still she is a devoted lady. She is the only lady and Chief Minister in our country, in spite of all such major damages she is struggling for countries well being. Hence I feel she deserves to have a leading role. So I gave my support to her. The people should think about such patriotic and true leader. As per me, I myself ,Have decided to scarify my life for the country and I feel Mamta Banerjee’s  view is matching with me,I supported her. That’s it.
   Her views to bring changes in this country are also very important. Mahatma Gandhiji used to say, village is the crucial agency to bring over all changes. He thought if proper management water is done and bringing increase in farm production, and out of this product, if we start some small scale industries, making available international market, we can stop the flow of people to cities. The problem of unemployment can be solved in the village itself. It can be helpful to strengthen not only villages’ but the whole countries’ economy. Mahatma Gandhiji used to say, if we change a village’s economy; it will lead to change the economy of country. Mamtaji is of the same opinion and so I like her inspired views and deeds. Today after independence we have adopted the policy of international market, but unfortunately this is leading to economic crisis. We have invited multinational companies. These companies are seeking lands; as a result forcefully these lands are being acquired. By any means the farmers are being robbed. Is this a real democracy? Today our rivers, dams, forests and almost everything is sold to these multinational companies, is it fare? It shows only few businessmen are running this country? In such hopeless and miserable circumstances Mamta Banarji’s views are really inevitable and acceptable.  We are heading towards destruction in respect of geological assets, as geological wealth is being extracted and being used without its effects. I think this is not real development.
   I haven’t literally supported Mamta Banerjee’s party, but I have supported her social and national ideology. This ideology can only lead the country towards development. Hence I appreciated her. Up to now the political parties in our country have been thinking only about coming into power. No party is talking about changing the system. Only Mamta Banerjee is thinking of changing the system. The work that took place in Bengal, if it applies for the entire country, it will definitely bring a hopeful picture. Only change of government is not the solution, change in system as the answer. I think Mamta Banarji has this answer.
   If the existing political parties expecting a good change they would have shown their willingness to implement these 17 points. But unfortunately no party except Mamta Banerjee has shown this will.
   I have also written the letter to Arvind Kejariwal containing these 17 points. If he is ready to accept these points, I will also support him, I have mentioned it. But he hasn’t given me any reply till now. It shows that in spite of thinking about the country, you are thinking only about coming into power. I think from such power country will not get anything. What is the difference between your party and the other parties?

K. B. alias Anna Hazare.
    


Thursday 27 February 2014

श्रीमती ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासंबंधीची भूमिका...



दि. 27 फेब्रुवारी 2014
       
      आज पर्यंत जीवनात कोणत्याही पक्ष आणि पार्टीला मी जाहीर पणे पाठिंबा व्यक्त केलेला नसल्याने, पहिल्यांदाच ममता बॅनर्जी यांना पाठिंबा व्यक्त केल्यामुळे अनेक लोक प्रश्न विचारायला लागले आहेत कि, पक्ष आणि पार्ट्या घटनाबाह्य निवडणुका लढवित आहेत असे आपण म्हणत आलात, मग या वेळी एका पार्टीला आपण पाठिंबा व्यक्त केला याचे कारण काय? त्याचे कारण असे आहे कि, 2014 ची निवडणुक म्हणजे देशातील बदल होण्याचा टर्निंग पॉईंट आहे. देशात वाढता भ्रष्टाचार, महागाई, अन्याय, अत्याचार वाढत चालल्या मुळे देशातील जनता परिवर्तनाचा विचार करीत आहे. अशा अवस्थेत अनेक वर्ष ठराविक पार्ट्याच या देशाचे नेतृत्व करीत आलेल्या आहेत. या पार्ट्या देशाला उज्वल भविष्य देऊ शकणार नाहीत.म्हणुन देशातील जनता वेगळा पर्याय कसा देता येईल असा विचार करीत आहे. देशातील मतदारांनी देशात बदल घडवून आणण्याचे ठरविले तर अशक्य नाही. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ममता बॅनर्जी आर्थिक दृष्ट्या गरीब आहे तर इतर पार्ट्यांच्या तुलनेत त्यांची पार्टीही गरीब आहे. मी कुठेही बँक बॅलन्स ठेवलेला नाही पण दोघांनाही देशा बद्दल तळमळ असल्याने हा प्रयत्न करीत आहोत. देशात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही 17 मुद्दे असणारे पत्र देशातील सर्व पक्ष आणि पार्ट्यांना लिहून विचारणा केली होती कि, या पत्रातील 17 मुद्द्यांची आपण अंमल बजावणी करायला तयार आहात का? या 17 मुद्द्यांची अंमल बजावणी झाली तर या देशाचे चित्र बदलुन जाईल. असा आम्हाला विश्वास वाटतो. पण एकाही पक्ष आणि पार्ट्यांनी आम्हाला उत्तर दिले नाही. फक्त ममता बॅनर्जींनी पत्र पाठवून कळविले कि, मी आणि माझी पार्टी सत्तेत आली तर ह्या 17 मुद्द्यांची अंमल बजावणी करण्यास तयार आहे. मी ममता बॅनर्जी विषयी अधिक माहीती घेतली असता पश्चिमबंगालच्या मुख्यमंत्री असुनही सरकारचा बंगला घेतला नाही, गाडी घेतली नाही, कोणताही पगार घेतला नाही. स्वताःच्या वडिलोपार्जित लहानशा घरा मधे रहाते. आजही हवाई चप्पल वापरते. खादीची साडी वापरते. हा जो त्याग केला आहे. तो सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टीने मला महत्वाचा वाटतो. समाज आणि राष्ट्रहितासाठी अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सारखी लढत आलेली आहे. डोक्यामध्ये मार खाऊऩ 65 टाके पडलेले आहेत. हात फॅक्चर झाले, पाय फॅक्चर झाले तरी सुद्धा ती बाई समाज हितासाठी सारखी लढते आहे. देशात एक मुख्यमंत्री म्हणून समाज व राष्ट्र हितासाठी एवढा मार खाणारा मुख्यमंत्री कोणी दुसरा दिसून येत नाही. एकमेव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असल्याने अशा माणसांनी देशाचे नेतृत्व करावे असे माझे मत झाले. त्यामुळे मी ममता बॅनर्जींना माझा पाठिंबा व्यक्त केला आहे. हा पाठिंबा फक्त येत्या निवडणुकापर्यंतच असेल. त्यासाठी जनतेने अशा त्यागी नेतृत्वाचा विचार करावा असे मला वाटते. मी माझे आयुष्य समाज आणि देश हितासाठीच अर्पण केलेले असल्याने ममता बॅनर्जींचे विचार मला पटतात म्हणून मी पाठिंबा दिला आहे. देशामध्ये बदल व्हावा या संबंधाने त्यांचे जे विचार आहेत ते आणखी महत्वाचे वाटतात. महात्मा गांधी म्हणत होत कि, देशाची अर्थ व्यवस्था बदलण्यासाठी गाव हे घटक धरुन त्या गावातील जमिन आणि पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले, कृषी उत्पन्न वाढवून त्या उत्पन्नावर आधारित उद्योग गावांमध्ये सुरु केले आणि परदेशातील मार्केट मिळवून मार्केट चा प्रश्न सोडविला तर गावातील लोक शहरांकडे धाव घेणार नाहीत. यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गावातच सुटू शकेस. त्याच बरोबर देशाची अर्थ व्यवस्था बदलेल. खेड्यांची अर्थव्यवस्था बदलली तर देशाची अर्थव्यवस्था आपोआपच बदलेल. महात्मा गांधीजी म्हणत होते देशाची अर्थ व्यवस्था बदलण्यासाठी खेड्यांची अर्थ व्यवस्था बदलावी लागेल. ममताजींचे हे विचार मला फारच प्रेरणादायी वाटतात. आज स्वातंत्र्यानंतर आम्ही बाजारीकरणाची निती अवलंबवली त्यामुळे या देशाची आर्थिक स्थिती डब घाईला आलेली आहे. बाजारनिती मुळे देशाची अर्थ निती बदलणार नाही.
      परदेशातील मोठ मोठ्या कंपन्यांना आम्ही आमच्या देशात आणले. कंपन्यांना लागणारी जमिन शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने घेतल्या. नाही दिल्या तर डंडे चालविले, गोळ्या चालविल्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. त्यांना देश धडीला लावले. यालाच आम्ही लोकशाही किंवा प्रजातंत्र म्हणणार काय? आज देशातील नद्या, धरणे, जंगले या परकिय कंपऩ्यांना देण्याचा घाट या देशात घालण्यात आला. लोकशाही किंवा प्रजातंत्रामध्ये देशातील ठराविक काही उद्योगपती हा देश चालवितात की काय? असा प्रश्न उभा राहिलेला आहे. अशा अवस्थेत ममता बॅनर्जी चे विचार या देशाला तारु शकतील असे वाटते. भुगर्भ आणि भुपृष्ठावरील साधन संपत्तीचे शोषण करुन केलेला विकास हा खरा शाश्वत विकास नव्हे. तर एक दिवस तो विनाश ठरेल. मी ममता बॅनर्जी या व्यक्तीला किंवा पार्टीला सपोर्ट केलेला नाही तर त्यांचे सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टीने जे विचार मला आवडले अशा विचारातुनच या देशाला उज्वल भविष्य मिळु शकेल. अशी माझी धारणा झालेली असल्याने मी त्यांना पाठींबा व्यक्त केलेला आहे. आज पर्यंत पक्ष आणि पार्ट्या फक्त सत्ता परिवर्तनाचा विचार करीत आल्या आहेत. संपुर्ण व्यवस्था परिवर्तना बाबत एकही पार्टी बोलत नाही. ममता बॅनर्जी तो विचार घेऊन कामकरतात जे कामपश्चिमबंगाल मध्ये झाले ते कामदेशात झाले तर या देशाचे चित्र बदलेल असा मला विश्वास वाटतो. फक्त सत्ता परिवर्तनातुन देश बदलणार नाही. हे स्पष्ट झालेले आहे. त्यासाठी संपुर्ण व्यवस्था परिवर्तनाचा विचार होणे आवश्यक आहे. व्यवस्था परिवर्तनाचा विचार पक्ष आणि पार्ट्यां मध्ये असता तर 17 मुद्द्या संबंधाने त्या पार्ट्यांनी जनतेला सांगितले असते की आम्ही ह्या 17 मुद्द्यांची अंमलबजावणी करायला तयार आहोत पण, एका ही पक्ष आणि पार्टी ने 17 मुद्दे संबंधाने पत्राला उत्तर दिले नाही. अरविंद केजरीवालच्या हातात मी 17 मुद्द्यांचे पत्र दिले होते. ते मान्य केले तर ममता बॅनर्जी प्रमाणे मी तुम्हाला ही सपोर्ट करायला तयार आहे. असे मी अरविंद केजरीवाल यांना सांगितले होते. मात्र अद्याप पर्यंत त्यांनी 17 मुद्द्यांबाबत पत्र दिले नाही. याचा स्पष्ट अर्थ होतो कि, देशाचा विचार करण्या पेक्षा तुम्ही सत्तेचा अधिक विचार करीत आहात, हे स्पष्ट होते. अशा सत्तेमधुन देशाला उज्वल भविष्य मिळु शकणार नाही असे वाटते. इतर पक्ष आणि पार्ट्या आणि तुमच्यामध्ये कोणताही फरक राहणार नाही असे मला वाटते.

कि. बा. तथा अण्णा हजारे



सुश्री ममता बॅनर्जी को समर्थन के बारे मे भूमिका...


27 फरवरी 2014

मेरे आजतक के सार्वजनिक जीवन में मैने किसी भी राजनैतिक दल का खुले आम समर्थन नही किया। इसलिये यह स्वाभाविक है की सुश्री ममता बॅनर्जी को मेरे समर्थन को लेकर सार्वजनिक तौर पर चर्चा हो रही है I राजनैतिक दल संविधान का हिस्सा नही है यह मेरी भूमिका रही है, फिर इस बार क्या कारण है की मैने इस प्रकार के दलीय समर्थन को ठीक समझा?
मै यह समझ रहा हुं कि, २०१४ के आम चुनाव बदलाव की घडी है I समुचे देशमें दिन-ब-दिन बढते भ्रष्टाचार, महंगाई, अन्याय, अत्याचार की बढती घटनाओं से तंग आ चुकी जनता अब परिवर्तन का बेसब्रीसे इंतजार कर रही है I इस स्थिती मे जहां विशिष्ट राजनैतिक दल ही बार बार सत्ता हासिल कर रहे है। परिवर्तन संभव नही हो पा रहा है। इसलिये पुरे देश में जनता इस पर गंभीरता से विचार कर रही है कि कैसे वैकल्पिक राजनीती को लोगों की राजनीती के रूप में प्रस्थापित किया जाये।  देश भर के मतदाता ने अगर बदलाव की ठान ली तो बदलाव सहज संभव है I हमे उसी दिशा में प्रयास करने होंगे।
लोक-राजनीती को मजबूत करने हेतू मैने १७ मुद्दों को लेकर बना ‘जनता का अजेंडा’ राजनैतिक दलों को भेज दिया था और दलों से अपील की थी की इन १७ मुद्दों का अमल करने पर वह अपनी प्रतिबद्धता सार्वजनिक रूपसे जनता को बतायेंमुझे पुरी तरह विश्वास है की यह १७ मुद्दे जनता कि दृष्टीसे अहम मुद्दे है मै स्पष्ट करना चाहता हुं की सुश्री ममता बॅनर्जी के तृणमूल कॉंग्रेस के अलावा दुसरे किसीभी दल ने इसपर कोई जवाब नही दिया सुश्री ममता बॅनर्जी ने मुझे पत्र लिख कर आश्वस्त किया की उनकी पार्टी इन सभी मुद्दोको अमल में लायेगी
मै जानता हुं की सुश्री ममता बॅनर्जी अपनी पुरी उम्र भ्रष्टाचार के खिलाफ लडती आयी है अपनी राजनैतिक भूमिका को उन्होने प्रामाणिकता से निभाया हैबतौर मुख्यमंत्री, सरकारी बंगला नही लिया अपने छोटे से घर मे सादगी के साथ रहती है खादी पहनती है अन्याय और अत्याचार के खिलाफ लगातार लड रही हैपुलीस की लाठीया झेल चुकी है मुझे लगता है इस प्रकार का त्याग समाज और राष्ट्र के लिये महत्वपूर्ण एवं आवश्यक है देश का नेतृत्व ऐसेही नेताओं को करना चाहिये ऐसा मेरा मानना है इसीलिये मैने उनका समर्थन किया यह समर्थन आनेवाले आम चुनावों के लिये ही सीमित है मैने भी अपना जीवन समाज और देश के हित में समर्पित किया है इसलिये मै उनके विचारोंसे सहमत हुं देश मे परिवर्तन लाने के संबंधी उनके विचार मुझे महत्वपूर्ण लगते है
 महात्मा गांधी का मानना था कि, देश की अर्थव्यवस्था में बदलाव लाना है तो गांव को ही मुख्य घटक समझ जाना चाहिये एवं पानी, जमीन जैसे प्राकृतिक संसाधानों का उचित नियोजन किया जाना चाहिये कृषी क्षेत्र से उत्पादन को बढावा दे कर कृषी आधारित उद्योगों को गांव मे प्रस्थापित किया जाना चाहिये इस से गावों से लोगों का शहरो मे रोजी रोटी के लिये आना कम होगा रोजगार की समस्या को गांव में ही हल किया जा सकता है गांधीजी कहते थे कि गावों की अर्थव्यवस्था में परिवर्तन ही देश कि अर्थव्यवस्था में परिवर्तन होगा मुझे लगता है की ममताजी इसी विचार को लेकर अपनी राजनीती कर रही है स्वतंत्रता के बाद हम ने बाजारीकरण को विकृत रुपसे अपनाया नतीजन देश की अर्थ व्यवस्था गहरे संकट में आ पडी है
बडी बडी मल्टी नैशनल कंपनियों ने एवं भारत के कॉर्पोरेट क्षेत्र ने देश की जल-जमीन-जंगल पर अपना कब्जा जमा लिया  किसानों से जबरदस्ती से जमीन छीन ली विरोध करनेवाले किसानों पर गोलिया चलाई इसको प्रजा तंत्र नही कहां जाता उद्योग क्षेत्र के मुठठीभर लोग देश चला रहे है प्राकृतिक संसाधानों का निजीकरण किया जा रहा है और प्रकृती का बेहद शोषण किया जा रहा है इस पर ममता-दीदी का चिंतन और विचार मेरे विचारो से मिलते है I मैने मात्र व्यक्ती ममता बॅनर्जी या उनकी पार्टी का समर्थन नही किया, उनके विचार एवं राष्ट्रीय भावना पर गौर करके उनका समर्थन किया है
आज तक हमारे देश के राजनैतिक दल सिर्फ सत्ता के परिवर्तन मे रुची रखते आये है; किंतु समग्र परिवर्तन किसी का अजेंडा नही रहा पश्चिम बंगाल में ममता दीदीने जो काम किया वह पुरे देश मे होना चाहिये तब जाके देश मे परिवर्तन होगा ऐसा मेरा मानना है अगर अन्य दलोंमे समग्र व्यवस्था परिवर्तन के लिये आस्था होती तो शायद वह मेरे १७ मुद्दोंका खुला समर्थन करते लेकिन अन्य किसी भी दलनें इस प्रकार की कोई भूमिका नही ली
इन १७ मुद्दोंका पत्र मैने अरविंद केजरीवाल को भी दिया था  अगर वो भी इन मुद्दोंसे सहमती दर्शाते है तो मै उनका भी समर्थन करूंगा ऐसा मैने उनसे कहां था। किंतु इस विषय मे उनका कोई रीस्पोंस मुझे प्राप्त नही हुवा इससे स्पष्ट है कि देश से ज्यादा सत्ता का विचार उनके मन मे प्रबल है इस प्रकार की सत्ता देश को उज्वल भविष्य नही दे सकती एवं उनकी पार्टी और अन्य पार्टीयोंमे कोई अंतर है ऐसा नही माना जा सकता, ऐसी मेरी धारणा है
        
        भवदीय,


   कि.बा.तथा अण्णा हजारे